Monthly Archives: August 2012

भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे !!!

रद्दी  आणि ती पण लाख मोलाची 🙂 .. आणि तशी ती होती पण . कारण ती रद्दी होती share certificates ची. जर मी त्याचा काही उपयोग करू शकले तर खरच ती रद्दी मला लाखांनी पैसे मिळवून देवू शकत होती. असं काही नाही कि त्या वेळी मला हे सगळं माहित होतं पण इतकं नक्की कळत होतं कि यातून काही तरी चांगलं निष्पन्न होवू शकेल.
पहिलं काम होतं ते ती रद्दी समजून घेण्याचं. Share विकण्या आधी, आपल्या कडे कुठ कुठ ले Share आहेत हे कळायला तरी हवं. त्या नंतर मग पुढचे प्रश्न, Share विकतात कसे, कुठल्या कंपन्या अजून चालू आहेत, कुठल्या बुडल्या .. प्रश्न खूप होते, म्हटलं कि एक एक करून उत्तरं शोधूया.
मग पुढचा प्रश्न, कि share च्या किमती कुठून कळणार ? ते त्यातल्या त्यात सोपं होतं. त्या किमती रोज पेपर मध्ये येतात. मी म्हटलं चांगलं आहे, लगेच दुसऱ्या दिवशी यजमानांना कामाला लावलं. Share च्या किमती शोधा आणि घेवून जा ती certificates विकायला. गेले बिचारे, तसं न जावून सांगतायत कुणाला ? 🙂
गेले,  ते इतकसं तोंड करून परत आले, मी विचारलं – ‘अहो काय झालं? Share मार्केट मध्ये लुटलं कि काय तुम्हाला कुणी ?’ तसा त्या काळी Share मार्केट हा एकूण लुटारू लोकांचा कारभार असाच एक समज होता. हे म्हणाले – ‘बाई, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तो ब्रोकर म्हणाला , कि पेपर मध्ये येतात ते कालचे भाव, तो भाव तुम्हाला आज नाही मिळणार साहेब. इथे दर मिनिटाला भाव बदलत असतो. तुम्ही विकायला सांगितल्या वर जो भाव असेल, तो तुम्हाला मिळेल किवा तुम्ही सांगा तुम्हाला काय भाव पाहिजे तो आणि मग तो भाव जेंव्हा येयील तेंव्हा तुमचे Share विकले जातील.’
लग्ना नंतर पहिल्यांदा मला वाटलं कि हे बरोबर म्हणत आहेत. आधी वाटलं तेवढं काही हे सोपं नाहीये. आता आपल्याला काय माहित कि कोणती किंमत बरोबर आणि ती केंव्हा मिळणार? त्या साठी प्रमाण काय ? ते कळणार कुठून? विचार केला कि पुस्तक वाचून कळेल, पण त्या काळी तशी काही पुस्तक मिळत नव्हती, किंवा मला मिळाली नाहीत. काही क्लास चालतात का याची पण चौकशी केली पण तिथे हि नकार घंटाच. आमच्या ओळखीत पण कोणाला या बद्दल काही माहित नव्हतं
म्हणजे जर पैसा उगवायचा असेल तर मलाच या अग्निदिव्यातून जायला लागणार होतं. आपण मेल्या शिवाय स्वर्ग दिसेल असं वाटत नव्हतं. अडकलेला पैसा हा कष्टाचा, घाम गाळून कमावलेला होता. तो वसूल तर करायचाच होता. मागे वळणं हा आता पर्याय नव्हताच.. सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे.. असच काही तरी मनात गुणगुणत मी पुढे निघाले. पुढचा प्रवास आता पुढच्या आठवड्यात. बोलूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे

कुठे होते मी गेल्या आठवड्यात ? hmmm आठवलं.. ४० वर्षाची मी , २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली.. बरोबर … तिथेच होते मी..  आपल्या ला जे येतंय त्याचा उपयोग, कष्ट ला साजेसं उत्पन्न आणि वयाची अट नाही  असं काही तरी करावं हा विचार..
आता तुम्हाला मी असंही सांगू शकते कि मी फार विचार केला आणि मग मला कळलं कि share मार्केट हाच माझ्या मुक्तीचा मार्ग 🙂 . पण असं नाहीये.. असतं तर फार छान पण नाहीये .. काही वेळा तुम्हाला कळत नकळत तुमच्या ध्येया कडे देव तुम्हाला घेवून जात असतो. तसच काही तरी माझं झालं.
माझे यजमान ( त्या कळत नवऱ्याला असच म्हणायचो आम्ही ) बँकेत काम करायचे, म्हणजे अजूनही करतात 🙂 . त्या कळत त्यांचं office BSC च्या जवळ होतं. office मध्ये stock मार्केट ची चर्चा होत असते. रस्त्या वर share चे forms ठेवलेले असायचे आणि आपण पण थोडी फार गुंतवणूक करावी अशा विचारानी त्यांनी काही forms भरले. भरले म्हणजे अगदी भरून पावले 🙂 .
सांगायचा अर्थ असा, कि Share तर हातात आले पण त्यांचं करायचं काय याची फारशी कल्पना नव्हती. आणि अश्या रिती ने आमच्या घरी share certificates ची  रद्दी जमा झाली. म्हणजे त्या काळी तरी मी त्याला रद्दीच म्हणायची. त्याला एक कारण होतं, मला कळायचा नाही कि याचा उपयोग काय आणि कधी, घरातल्या इतक्या गोष्टीं बरोबर अजून एक सांभाळा !!! पण तेव्हा मला कल्पना नव्हती कि हीच रद्दी मला माझ्या नशिबाची किल्ली देणार आहे.
चला आता परत २००२ सालात जावूया. असा विचार करा, कि नोकरी शोधून कंटाळलेली मी आणि माझ्या समोर पडलेली हि रद्दी. नोकरी मिळणं कठीण होतं आणि व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हवं. त्या वेळी आमच्या गृहिणींची एक सवय उपयोगायला आली. काहीही नवीन जेवण करण्या आधी आम्ही आधी घरात काय काय आहे ते बघतो आणि मगच बाहेरून काय लागेल ते आणायला जातो. मी पण तेच केलं.
ठरवलं कि ह्या रद्दी चा उपयोग करायचा आणि भांडवल उभं करायचं. पैसे तसे हि अडकलेलेच होते आणि certificates घरी पडूनच होती. Share विकले नाहीत तर हातात फ़क़्त रद्दी राहणार होती आणि ब्रोकर तर्फे विकले तर तो २०% घेणार असं सगळ्यांनी सांगितलं. झाला तर फायदा आणि नाही तर नाही. गुंतवणूक होती ती फ़क़्त माझ्या मेहेनती ची. गेल्या १० वर्षात जे काही केलं ते सगळं इथे सुरु झालं.
पुढचं सगळं सांगणारच आहे पण ते पुढच्या आठवड्यात .. येते आता , नंतर भेटूच ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग २ – केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे..

आज चा संवाद सुरु करण्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. किंवा अस समजा कि तुम्हाला समजावून द्यायची आहे. मी तुमच्या पेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यात लीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. आणि या पुढे मी जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्हाला सर्वात जास्त जाणवेल.
आता मी सागते त्या प्रसंगात स्वताला ठेवण्या चा प्रयत्न करा. साल २००० , ४०-४२ वर्षाची, मी २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली. माझं graduation १९७४ साली झालेलं. कॉम्पुटर च्या knowledge च्या नावानी शंखनाद. बऱ्याच जागी वयाच्या अटीत मी बसत न्हवते. फारसे काही interview calls येत नव्हते. जे येत होते त्यांना काही अर्थ नव्हता. या सगळ्या मध्ये एका महाभागाने मला मुक्ती चा मार्ग दाखवला आणि मला नोकरी च्या मोह्मयेतून बाहेर काढलं. तुम्ही विचार करत असाल कि त्या पठ्ठ्याने असं काय सांगितलं? ऐका तर मग – ‘ तुम्ही ४० वर्षाच्या , तुम्हाला जितका पगार देणार तितक्या पगारात आम्हाला २०-२२ वर्षाची computer educated मुलं मिळतात , तर मग आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ?’ प्रश्न अगदी बरोबर होता, उत्तर माझ्या कडे बिलकुल न्हवतं.
आता मी तुम्हाला सांगते कि मी इथपर्यंत आले कशी?. असं नाही कि मी कधी नोकरी केलेली नव्हती. लग्न आधी मी commerce graduate होते. लग्ना नंतर वकिली चं शिक्षण घेतलं. lecturer म्हणून नोकरी लागली. नोकरी करायची म्हणजे मला माझ्या लहान मुलीला शेजारी सोडावं लागे, तिच्या कडे थोडं दुर्लक्ष होई. हे सगळं मनाला पटत नव्हत. स्वताची पोळी भाजण्या साठी इतरांकडे दुर्लक्ष करण योग्य नाही असं वाटत होतं. जीवाची ओढाताण होत होती. घरातही या गोष्टींवर चर्चा होवू लागली. आयुष्यात लहानपणाची काही वर्ष फार महत्वाची असतात. त्यावेळी आईचा सहवास मिळाला नाही , संस्कार घडले नाहीत तर पोरके पण वाटतो. त्यामुळे मुलं लहान असताना नोकरी करू नये व मुलं मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करावी, स्वत:चं career करावं असं ठरलं.
आणि आधी सांगितलं ते या नंतरचं सगळं रामायण. आता मागे वळून बघितला तर हसायला येतं पण त्या वेळी मात्र ते एकून तोंडाच पाणी पळाल होतं. एक गोष्ट मात्र साफ होती, आता जे काय करायचं तिथे वयाची अट असता कामा नये, मला जे आधी पासून येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या श्रमाला साजेसा पैसा त्यातून मिळाला पाहिजे. नोकरी मिळणं आता मुश्कील आहे हे साफ होतं, आणि मिळाली तरी ती काही मला पाहिजे तशी मिळणार नव्हती.
हा सगळा विचार करत असताना एक सुंदर कल्पना त्या वेळी माझ्या मनात आली आणि त्याच कल्पने चा हा सगळा प्रवास. कसली कल्पना आणि कुठला प्रवास ते पुढे सांगीनच, पण आज इथेच थांबते. परत भेटूच आपण, पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत राम राम.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा